अपघात....मध्य प्रदेश येथील मजूर ते जालना येथे लॉकडाऊनमध्ये अडकले होते. घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते. सटाना परिसरात ते रुळावर झोपले असताना मालगाडीने त्यांना चिरडले. या १४ जणांचा जागेवर मृत्यू झाला या धक्कादायक प्रसंगाची तिव्रता हदयालाही पाझर फुटेल आणि डोळ्यांच्या कढ पाणवल्याशिवाय राहणार नाहीत ..कवी तायडे यांच्या .. भूक-भाकरी आणि मृत्यूचे सौदागर आबाद राहोत..! ढाळू नयेत अश्रू कुणीही... फारच अगतिक असाल तर.. तुमचा आक्रोश ,असहाय्यता, चीड ,संताप सरकारी कागदात गुंडाळून ठेवा. आमच्या जाण्यामुळे काहीच फरक पडणार नाही उलट बोजाच पडेल सरकारी तिजोरीवर, मरणोत्तर अनुदानाचा....! आम्ही आमच्या स्वप्नां सकट चिरडले गेलो म्हणून चांगलं झालं कारण आमची स्वप्नांही आमच्यासारखीच दळभद्री स्वप्ने तुमच्या सो कॉल्ड डिजिटल इंडियाला व्हायरस सारखी वाटतात ... आमचे छिन्न-विच्छिन्न झालेले देह पुन्हा -पुन्हा दाखवून आता काय हो उपयोग आधुनिक मीडियाला...! आणि आमची "प्रेतं" परतणार का? आम्ही आमच्या मुलखात परतणार होतो,बरे झाले नाही परतलो, कारण.. तो मुलुख आमचा नाही , ...