परळी येथे शिवाजी चौकात फिरनाऱ्यांवर पोलिसांनी दंड करात केली कारवाई

Image
 परळी शहरात कोरोना बाधितांचे संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तरीही नागरिक सोशल डिस्टन्सचे नियम न पाळता दुचाकीवर डब्बल व टीब्बल सीट फिरत आहेत.त्यामुळे दुचाकीवर फिरताना तोंडाला मास्क न लावणाऱ्या सोशल डिस्टन्स नियम न पाळणाऱ्याना आज सकाळी शिवाजी चौकात पोलिसांनी कारवाई करत दंड वसूल केला. नागरिकांमध्ये कोरोनाच्या बाबत कसलीही जनजागृती दिसून येत नाही. म्हणून आज (शनिवार) रोजी पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.

आम्ही आमच्या स्वप्नां सकट चिरडले गेलो म्हणून चांगलं झालं कारण आमची स्वप्नांही आमच्यासारखीच दळभद्री स्वप्ने

अपघात....मध्य प्रदेश येथील मजूर ते
जालना येथे लॉकडाऊनमध्ये अडकले होते. घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते. सटाना परिसरात ते रुळावर झोपले असताना मालगाडीने त्यांना चिरडले. या १४ जणांचा जागेवर मृत्यू झाला
या धक्कादायक प्रसंगाची तिव्रता हदयालाही पाझर फुटेल आणि डोळ्यांच्या कढ पाणवल्याशिवाय राहणार नाहीत ..कवी तायडे यांच्या ..

भूक-भाकरी आणि मृत्यूचे सौदागर आबाद राहोत..!


ढाळू नयेत

अश्रू कुणीही...
फारच अगतिक असाल तर.. तुमचा आक्रोश ,असहाय्यता, चीड ,संताप सरकारी कागदात गुंडाळून ठेवा.
आमच्या जाण्यामुळे काहीच फरक पडणार नाही उलट बोजाच  पडेल सरकारी तिजोरीवर, मरणोत्तर अनुदानाचा....!
आम्ही आमच्या स्वप्नां सकट चिरडले गेलो  म्हणून चांगलं झालं कारण आमची स्वप्नांही आमच्यासारखीच दळभद्री स्वप्ने तुमच्या सो कॉल्ड डिजिटल इंडियाला व्हायरस सारखी वाटतात ...
आमचे छिन्न-विच्छिन्न झालेले देह पुन्हा -पुन्हा दाखवून आता काय हो उपयोग आधुनिक मीडियाला...!
आणि
आमची "प्रेतं" परतणार का?
आम्ही आमच्या मुलखात परतणार होतो,बरे झाले नाही परतलो,
कारण.. तो मुलुख आमचा नाही ,
हा उजेड आमचा नाही ,
हा देशच आमचा नाही,
आमचं नातं अंधाराशी कायमचं...
जाती धर्माचे ठेकेदार 
आंदोलने-उठावही करतील कदाचित पण असो ...
आमच्या मातीतल्या पण आमच्या नसलेल्या माणसांना अलविदा..!
सत्ता-संपत्तीच्या चिखलात बरबटलेले भूक-भाकरी आणि मृत्यूचे सौदागर आबाद राहोत हीच प्रार्थना...!

✒प्रा. सिद्धार्थ तायडे


Comments

दर्जेदार साहित्य वाचा