परळी येथे शिवाजी चौकात फिरनाऱ्यांवर पोलिसांनी दंड करात केली कारवाई

Image
 परळी शहरात कोरोना बाधितांचे संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तरीही नागरिक सोशल डिस्टन्सचे नियम न पाळता दुचाकीवर डब्बल व टीब्बल सीट फिरत आहेत.त्यामुळे दुचाकीवर फिरताना तोंडाला मास्क न लावणाऱ्या सोशल डिस्टन्स नियम न पाळणाऱ्याना आज सकाळी शिवाजी चौकात पोलिसांनी कारवाई करत दंड वसूल केला. नागरिकांमध्ये कोरोनाच्या बाबत कसलीही जनजागृती दिसून येत नाही. म्हणून आज (शनिवार) रोजी पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.

पावसामुळे व वातावरणातील बदलामुळे कांद्याचे पीक धोक्यात

 बीड जिल्ह्यात चिंचाळा येथील शेतकऱ्यांचा कांदा जळून गेला आहे. म्हणून शासनाने कांदा गेलेल्या शासनाने तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी येथील शेतकरी बाबासाहेब वाघुले यांनी आज (शुक्रवार) रोजी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

परतीच्या पावसाने व वातावरणातील बदलाने कांद्याचे पीक धोक्यात आले आहे. सध्या कांद्याचे पिक करपा रोगाच्या संकटात सापडलेला आहे. सकाळी पडणारे दव यामुळे कांद्यावर इतर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. 

Comments

दर्जेदार साहित्य वाचा