परळी येथे शिवाजी चौकात फिरनाऱ्यांवर पोलिसांनी दंड करात केली कारवाई

Image
 परळी शहरात कोरोना बाधितांचे संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तरीही नागरिक सोशल डिस्टन्सचे नियम न पाळता दुचाकीवर डब्बल व टीब्बल सीट फिरत आहेत.त्यामुळे दुचाकीवर फिरताना तोंडाला मास्क न लावणाऱ्या सोशल डिस्टन्स नियम न पाळणाऱ्याना आज सकाळी शिवाजी चौकात पोलिसांनी कारवाई करत दंड वसूल केला. नागरिकांमध्ये कोरोनाच्या बाबत कसलीही जनजागृती दिसून येत नाही. म्हणून आज (शनिवार) रोजी पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.

कोरोना विषाणूंचा वाढता प्रसार पाहता कोरोनाला हरवायचे असेल तर सवयी बदला- डॉ.अर्शद शेख


परळी येथे कोरोना विषाणूंचा वाढता प्रसार पाहता प्रत्येकाने वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर खबरदारी घेण्याची व आपल्या जुन्या सवयी बदलून नव्या सवयी लावून घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन परळीतील वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्शद शेख यांनी आज सोमवार रोजी केले आहे.शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे पत्रकारांना कोविड-१९ बाबत प्रशिक्षण देताना ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, लॉकडाऊन हा कोरोना वरील कायमस्वरूपी उपाय नसला तरी ह्या कालावधीमध्ये आपल्याला भावी संकटाला तोंड देण्याच्या उद्देशाने तयारी करण्यासाठी वेळ मिळाला आहे. तसे पाहिले तर सध्या प्रत्येकाकडे कोरोना बाबत माहिती भरपूर झालेली आहे. आता यापुढे आणखी माहितीची गरज नसून मिळालेली माहिती खऱ्या अर्थाने अंमलात आणण्याची गरज आहे. 
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, कुणाच्याही हातामध्ये हात न देता आपण लांबूनच हात दाखवण्याची सवय लावली पाहिजे. त्याचबरोबर पाच फुटांचे अंतर राखण्याची सवय तर आपल्या घरापासूनच लावली पाहिजे.प्रत्येकाने चेहऱ्यावर मास्क लावणे गरजेचे असून चेहऱ्याला चुकूनही हात लागणार नाही अशी सवय देखील करून घेणे गरजेचे आहे.
कुठल्याही कामानिमित्त बाहेर जाऊन आल्यानंतर आपला मास्क डेटॉल च्या पाण्यात टाकून स्वच्छ करणे, योग्यरीतीने हात धुणे, आठवड्यातून दोन वेळा नखे कापणे, हात-पाय-तोंड धुवूनच घरात प्रवेश करणे, चप्पल बाहेरच ठेवणे, दरवाजा उघडण्यासाठी हाताचा वापर न करता खांद्यांनी दरवाजा उघडण्याची सवय लावणे, कपडे डिटर्जंट च्या पाण्यात बुडविणे, त्यानंतर आंघोळ करणे, फळे, भाजीपाला मिठाच्या पाण्यात धुऊनच वापरायला घेणे अशा सवयी व शिस्त लावण्याची गरज आहे.                                      घरातील एखाद्या सदस्याला सर्दी- खोकला अशी लक्षणे आढळल्यास त्याला घरातच आयसोलेट करणे व त्यानंतर रुग्णालयाच्या कॉल सेंटर ला फोन करणे आवश्यक आहे. त्यानंतर रुग्णालयातील स्टाफ तर्फे रुग्णावर टेलिमेडिसीन द्वारे उपचार केले जातील .त्यानंतरही जर रुग्णाची तब्येत खालावत असेल तर मात्र रुग्णाला घेऊन येण्यासाठी रुग्णालयातर्फे ॲम्बुलन्स पाठविली जाईल .शेवटी ते पुढे म्हणाले की, कोविड-१९ ह्या आजारावर सध्या कोणताही उपचार उपलब्ध नसून खबरदारी घेणे हेच आपल्या हातात आहे. लॉकडाऊन च्या कालावधीमध्ये आपल्याला पुरेसा वेळ मिळाला असून या वेळेत आपण आपल्या सवयी बदलण्याची नितांत गरज आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला. प्रशिक्षणासाठी अनेक पत्रकार उपस्थित होते. डॉ शेख यांनी यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे  दिली.

Comments

दर्जेदार साहित्य वाचा